पंतप्रधान आवास योजनेसाठी फेरनिविदा काढा असा शासनाचा आदेश

0
169

मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुम्हाला दररोज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या ठिकाणी नवीन जॉब ची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्याच सोबत विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन योजना आणि स्कॉलरशिप बद्दल सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून पुरवणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरी बांधण्यासाठी फेरनिविदा काढून कंत्राटदार निश्चित करा, असे आदेश राज्य सरकारने औरंगाबाद महानगरपालिकेला दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने घरी बांधण्यासाठी दिलेल्या जागेवर अतिक्रमणे, डोंगर खदान असल्यामुळे चाळीस हजार पैकी पंधरा ते सतरा हजार घरांचे काम बांधकाम करणे शक्य आहे मनपाकडे सुमारे 39 हजाराहून अधिक लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी फेब्रुवारी 2022 मध्ये जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेला तिसगाव, पडेगाव,चिकलठाणा आणि सुंदर वाडी या पाच ठिकाणच्या जागा उपलब्ध करून दिल्या. सर्व जागांचे क्षेत्रफळ 128 हेक्टर आहे.

उपलब्ध होण्यापूर्वीच डीपी आर तयार करण्यात आला. चाळीस हजार गरीब बांधण्याचे नियोजन करण्यात आले, 31 मार्चपूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे मनपाला बंधनकारक होते. घाई गडबडीमध्ये कंत्राटदारही निश्चित करण्यात आला. कंत्राट दाराची आर्थिक क्षमता नसताना वर्क ऑर्डर दिल्याचा आरोप झाला.

पंतप्रधान आवास योजने

त्यादरम्यान मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडे यांची बदली झाली. विद्यमान प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांची आवास योजनेच्या सर्व जागांची पाहणी केली, तेव्हा अडचणी चा डोंगर लक्षात आला.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मनपाणी समिती स्थापन केली शासनाने गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांच्या समितीमार्फत स्वतंत्र चौकशी केली. या सर्व समित्यांचा अहवाल व महानगरपालिकेचे म्हणणे लक्षात घेत राज्य सरकारने फेरनिविदा काढण्याचे आदेश महानगरपालिकाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here